|
भुमिका सप्ताहिक न्यायस्वातंत्र्य समता या वृत्तपत्राच्या माध्यमातुन देशांतील वृत्तपत्रांच्या संपादक, मालक, प्रकाशक यांना एकाच व्यासपिठावर आणण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रतील पत्रकारीतेचा अभ्यास केला असता दरवर्षी जवळ जवळ 5 हजार वृत्तपत्रे नव्याने जनते समोर येत असतात. यशस्वी वृत्तपत्राची आकडेवारी पाहिली की, लक्षात येते की बोटावर मोजण्या एवढीच वृत्तपत्रे यशस्वी झालेली दिसतात. अयशस्वी वृत्तपत्रांचा आकड़ा भयानक व व्यथित करणारा आहे हजारो संपादक वृत्तपत्रे यशस्वीरित्या न चालऊ शकल्या मुळे नैराश्येत जातांना दिसतात. ज्या हेतुने या क्षेत्रात हे लोक पदार्पण करतात तो हेतु मागे पडून ही संपादक मंडळी अन्य क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवतात. हीच परिस्तिथी संपूर्ण देशात आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. लोकशाही जर वृद्धिंगत करावयाची असेल तर हि छोटी छोटी वृत्तपत्रे टिकली पाहिजेत. अन्यथा प्रस्थापित भांडवलदार वृत्तींच्या वृत्तपत्र मालकांच्या हाती हे क्षेत्र जाईल. व भारतातील स्थैर्य कायम राहणार नाही व आपला देश रसातळाला जाण्यापासून कुणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे पत्रकारितेचा पवित्र हेतू टिकवण्यासाठी या सर्व संपादकांना बळ देणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी आपण कटिबद्ध होऊ या.
न्यायस्वातंत्र्य समता च्या माध्यमातून वृत्तपत्रांचे आर. एन. आय. रजिस्ट्रेशन, ऑडीट व जाहिरात यादीवर येणे संबंधी मार्गदर्शन केले जाईल जेणे करून हि वृत्तपत्रे टिकतील व लोकशाही बळकट करण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होतील. या महा सदस्य नोंदणी अभियानात तुंम्ही हि सहभागी होऊन याचा लाभ घ्या |